१ फेब्रुवारी १६८९ या दिवशी शेख निजामाने संगमेश्वर येथे अचानक छापा टाकला. त्यात संभाजी राजे व कवी कलश हे दोघे जण कैद झाले. त्या वेळेस औरंगजेबाचा मुक्काम अकलूजला होता. त्याने तेथून हुकूम फर्माविला, की कैद्यांना पेडगाव येथील बहादूर गडाच्या छावणीत आणण्यात यावे.इ.स. १६८९ च्या सुरवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. १ फेब्रुवारी, इ.स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरावर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिर्क्याने कमालीची गुप्तता बाळगली. मराठयांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठयांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले.

