State

केंद्रीय अर्थसंकल्प विकासाला पूरक असेल : मुख्यमंत्री बोम्मई

Share

देशाची अर्थव्यवस्था कोविड संकटातून आता कुठे बाहेर येत सुधारत आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प विकासाच्या दृष्टीने पूरक असेल असा विश्वास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला.

बेंगळुरातील आरटी नगरातील आपल्या निवासस्थानी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, आज केंद्र सरकारचा अर्थसंकल्प मांडण्यात येईल. कोविड स्कँत्काळातील हा तिसरा अर्थसंकल्प आहे. गेल्या २ अर्थसंकल्पावर कोविडची छाया होती. मात्र आता अर्थव्यवस्था रुळावर येत आहे. त्यामुळे यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प विकासाला पूरक ठरेल असा विश्वास आहे. आर्थिक सर्वेक्षणात विकासदर ८.८% राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे अर्थसंकल्प प्रगतीपर असेल असा विश्वास बोम्मई यांनी व्यक्त केला.

रेल्वेच्या शिल्लक कामांबद्दल बोलताना बोम्मई म्हणाले, यात काही प्रमुख समस्या आहेत. भूसंपादन, ५०:५० तत्वाने योजनांना अनुमती देताना राज्यांच्या आर्थिक समस्या विचारात घ्याव्या लागतात. त्यामुळे सगळं विचार करून निर्णय घ्यावे लागतात.

जीएसटीसंदर्भातील प्रश्नावर बोम्मई म्हणाले, जीएसटीसंदर्भातील कोणताही निर्णय जीएसटी कौन्सिल घेते. जीएसटी कमी करणे, त्यात सवलत देणे असे निर्णय या कौन्सिलच्या हातात आहेत. केंद्र सरकारच्या अधीन कौन्सिल नाही. त्यामुळे यावर चर्चा करून कौन्सिलनेच निर्णय घ्यायला पाहिजे. बाईट

टोईंग पॉलिसीबाबतच्या प्रश्नावर मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, याबाबत अनेक चर्चा होत आहे. अनेक प्रकारचे सल्लेही देण्यात आले आहेत. वाहतूक व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत. यादी वाहतूक व्यवस्थापनाची व्यवस्था काय होती आणि आत कशी असावी याबाबत विचार करण्यास सांगितले आहे. वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यास सांगितले आहे. दंडाबाबतही फेरविचार करण्यास सांगितले आहे. याबाबत सरकार पातळीवर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

Tags: