सिद्दरामय्या आणि डी. के. शिवकुमार हे दोघे तेल आणि पाणी असल्यासारखे आहेत. ते कधीही एक होणार नाहीत. त्यांच्या प्रचंड मतभेद आहेत अशी बोचरी टीका जलसंसाधन मंत्री गोविंद कारजोळ यांनी केली.
बागलकोट येथे पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री कारजोळ म्हणाले, काँग्रेसमध्ये खर्गे गट, परमेश्वर गट आणि शामनूर शिवशंकरप्पा असे ३ गट आहेत. आमच्याच योजना नाव बदलून पुढे चालविल्या या सिद्दरामय्यांच्या आरोपाचाही कारजोळ यांनी समाचार घेतला. लोकांनी काँग्रेसचा दारुण पराभव केला. हे सिद्दरामय्या यांनी समजून घेतले पाहिजे. सिद्दरामय्या यांच्या काळात कोरोना आला नव्हता. तरीही त्यांनी कोणतीही विकासकामे केली नाहीत. विकास केला नाही म्हणूनच लोकांनी त्यांना नाकारले असा टोला त्यांनी हाणला.
काँग्रेस ही बुडती नौका आहे, त्यात कोणीही आमदार जाणार नाही. भाजपात बाहेरचे आमदार असे कोणी नाही. जे आलेत ते पक्षाचे प्राथमिक सदस्य बनूनच आलेत. मरेपर्यंत ते भाजपच्याच राहतील असे त्यांनी म्हटले आहे. बेळगाव जिल्हा भाजपमध्ये कसलेच मतभेद नाहीत असे मंत्री कारजोळ यांनी स्पष्ट केले. बाईट
चहा पिण्यासाठी एकत्र जमले तरी तुम्ही प्रसारमाध्यमे, मतभेद असल्याची आवई उठवता, मतभेद असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनीच उठवले आहे. बेळगाव जिल्हा भाजपमध्ये मतभेद नाहीत. कत्ती यांच्या घरी झालेल्या बैठकीला जारकीहोळी याना निमंत्रण नव्हते असे नाही असे मंत्री कारजोळ म्हणाले.
एकंदर, काँग्रेस ही बुडती नौका आहे, त्यात कोणी आमदार जाणार नाही असा विश्वास मंत्री गोविंद कारजोळ यांनी यावेळी व्यक्त केला.

