Uncategorized

बोम्मई सरकारच्या जाहिरातींवर सिध्दरामय्यांची टीका!

Share

बोम्मई सरकारच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले भाजप सरकार हे जनतेला केवळ खोटी आश्वासने देत आहेत. एकीकडे पूर परिस्थिती, कोविडमुळे निर्माण झालेली बिकट परिस्थिती आणि दुसरीकडे रंगीबेरंगी जाहिरातींच्या माध्यमातून होणारी जनतेची फसवणूक आणि जाहिरातींसाठी सरकारी खजिन्यावर पडत असलेला कोट्यवधी रुपयांचा भर या साऱ्या बाबींवर टीका करत सिध्दरामय्यांनी सरकारवर निशाणा साधलाय.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या सरकारला सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. बेंगळूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी सत्ताधारी आणि बसवराज बोम्मई यांच्या सरकारवर निशाणा साधलाय. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे सरकार हे नवे नसून अडीच वर्षांपूर्वीचे सरकार असल्याचे सांगत येडियुरप्पा यांच्यानंतर केवळ मुख्यमंत्री बदल झाल्याची टीकाही सिध्दरामय्यांनी केली.

येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना बसवराज बोम्मई हे गृहमंत्री होते. आधीच्या सरकारने केलेल्या योजनांमध्ये बोम्मई सरकारने काही सुधारणा केल्या आहेत. नव्याने कोणत्याही योजना आखण्यात आल्या नसून सिंचनासाठी खर्च करण्यात आलेला तपशील देखील सरकारच्या जाहीरनाम्यात सुंदर रित्या समाविष्ट करण्यात आला आहे. ६३०० कोटी रुपये सिंचन प्रकल्पासाठी खर्च करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक वर्षी कमीतकमी ३० हजार कोटी खर्च अपेक्षित असूनही केवळ ६३०० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती जाहीरनाम्यात देण्यात आली आहे, असे सिद्धरामय्या म्हणाले.

या जाहीरनाम्यान प्रत्यक्ष गोष्टींपेक्षा आश्वासनेच अधिक असून पुढील टन वर्षांच्या कालावधीसाठी बेंगळूरकरिता ६ हजार कोटी खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ५ लाख घरे बांधणी, अमृत योजनेंतर्गत ७५० शाळांसाठी १० लाखांचा खर्च, २५ रुग्णालयांची २५ लाखांचा खर्च सुधारित खर्च नमूद करून अमृत ग्राम योजनेचे आश्वासन देण्यात आले आहे. जुन्या उपक्रमांना नवी नावे देण्यात आली आहेत. एच. के. पाटील ग्रामविकास मंत्री असताना सेवा केंद्र होती त्याचीच आता ग्राम वन योजना झाली असून याला यश म्हणतात का? असा उपहासात्मक प्रश्न सिध्दरामय्यांनी उपस्थित केलाय.

कल्याण कर्नाटकाची ३ हजार कोटी खर्च करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. यासाठी १ कोटी च्या आसपास अनुदानातून कृती आराखडा तयार करण्यात आला होता. अद्याप फेब्रुवारी, मार्च हे महिने शिल्लक आहेत. तोवर आणखी किती खर्च करणार? असा सवालदेखील सिध्दरामय्यांनी उपस्थित केला. कोविड मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेकजण बेरोजगार झाले, दरम्यान काहींनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. एनसीआरबी अहवालानुसार १ लाख ५३ हजार जणांनी आत्महत्या केली आहे. बेरोजगारीमुळे अनेकांनी आत्महत्या केली असून आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना अद्याप भरपाई देण्यात आली नसल्याचा आरोपही सिध्दरामय्यांनी केला.

Tags: