बेंगळुरात अखिल भारतीय विध्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध करून अभाविप कार्यकर्ते व कायदा अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे.
होय, बेंगळूर विद्यापीठात परीक्षा, मूल्यमापन आणि फेर मूल्यमापनासह अन्य मागण्यांसाठी विध्यार्थी आंदोलन करत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केल्याची घटना घडली होती. त्यामुळे पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन अभाविप कार्यकर्त्यांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
याबाबत बोलताना कायदा अभ्यासक्रमाचा विध्यार्थी नारायण बागी यांनी सांगितले की, बेंगळूर विद्यापीठात परीक्षा, मूल्यमापन आणि फेर मूल्यमापनासह अन्य मागण्यांसाठी विध्यार्थी आंदोलन करत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला आहे. त्यामुळे पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना दिले आहे. बाईट
यावेळी बोलताना अन्य विध्यार्थ्यानी सांगितले की, अभाविप कार्यकर्ते आणि कायदा अभ्यासक्रमाचे विध्यार्थी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला आहे. त्यामुळे आम्हाला दुःख झाले आहे. याबद्दल पोलिसांवर कारवाई केली पाहिजे. म्हणून आम्ही आज गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे असे सांगितले.
दरम्यान विद्यार्थ्यांची या निवेदनाची सरकार कशी दखल घेते हे पहावे लागेल.

